संदेश

नवंबर, 2020 की पोस्ट दिखाई जा रही हैं

संसदीय लोकशाही मूल्यांचा उद्गाता : महात्मा बसवेश्वर

चित्र
           जगाच्या इतिहासात प्लेटो आणि बुद्धांचा अपवाद सोडला, तर लोकशाही मूल्यांचा व्यापक विचार करून ती मूल्य आचरणात आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा बसवेश्वर. ज्या काळात अमेरिका हा देश अस्तित्वात नव्हता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, चीन रशिया या देशातूनही राजेशाहीचा उद्घोष होत होता. तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी येथे लोकशाही मूल्य रूजवण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल केली. या जगातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वांतत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सहिष्णुता, सत्य, अहिंसा या लोकशाही मूल्यांची मांडणी केली. या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी रचनात्मक अशी कल्याणक्रांती केली. राजेशाहीच्या काळात कुणाच्या ध्यानी मनीही संसदेची कल्पना नव्हती, तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी लोकशाही मूल्याचे अधिष्ठान देऊन अनुभव मंटपाची उभारणी केली. त्यांचे हे अनुभव मंटप म्हणजे प्रगल्भ संसदीय लोकशाहीचा या जगातला पहिला आविष्कार होता. बौद्ध धर्माचा अपवाद सोडला तर जगातील बहुतांश धर्म, पंथ कुठल्यातरी प्रेषित वा अवतारी पुरुषाने मांडलेल्या विचारातूनच आकाराला आली. या धर्माच्या जडणघडणी पासून सामान्य ...

भारतीय संतांच्या भूमिकेतून वर्तमान अर्थचक्र

चित्र
      कोरोना विषाणूने संपूर्ण जगाची झोप उडवली. सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, पद, प्रतिष्ठा,कीर्ती या गोष्टी आज अर्थहीन ठरल्या. राजा पासून रंकापर्यंत सर्वांना जमिनीवर आणणारे हे संकट ठरले. अत्यावश्यक सेवांचा अपवाद सोडला तर संपूर्ण जग बंदिस्त करणारे हे संकट सर्वार्थाने अपूर्व आणि अविस्मरणीय आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी प्राणपणाने कोरोना विषाणू विरुद्ध लढत आहेत. ज्यांचे हातावर पोट आहेत, ते सर्व हवालदिल आहेत. उद्याच्या चिंतेने अनेकांची झोप उडाली. जगाचे सर्व प्रस्थापित अर्थिक समीकरणे मोडीत निघाली. कोरोना महामारीने बहुतांश देशाचा आर्थिक कणाच मोडला. यातून एक सार्वत्रिक हतबलता आली. शारीरिक आरोग्या प्रमाणेच आर्थिक आरोग्य सुधारण्याचे मोठे आव्हान आज अर्थशास्त्रज्ञा समोर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार  कोरोना महामारीचे  विक्राळ रूप अजून  पुढेच आहे. यामुळे उद्याची आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल अंदाज करणे देखील कठीण झाले आहे. अर्थतज्ञाकडून आज केवळ शक्यता वर्तवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर चिरंतन भारतीय संत साहित्यातून कोणता संदेश मिळतो याचा शोध घेण्याच्य...